MPSC, UPSC व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त माहीती



युपीएससी-एमपीएससी परीक्षांसाठी अनेक
पुस्तकं उपलब्ध आहेत. जाडजूड, मोठाली, सविस्तर
माहिती देणारी ही पुस्तकं असतात. पण
त्यांचा अभ्यास करताना काही गोष्टी डोक्यात
ठेवल्या पाहिजेत.

स्पर्धा परीक्षांवर पुष्कळ माहिती उपलब्ध
आहे. वेबसाइट्स, पुस्तकं, मासिकं, सीडीज
यांसारख्या अनेक माध्यमांतून माहिती मिळत
असते. पण माहितीचे जेवढे स्रोत जास्त असतात
तेवढीच कन्फ्युजन होण्याची शक्यताही जास्त
असते. त्यामुळे सगळी पुस्तकं
थोडी थोडी वाचण्यापेक्षा एकच पुस्तक
खूपदा वाचा. कारण पुस्तक कुठलंही असो पहिलं
महायुद्ध सगळीकडेच एकसारखं असणार आहे.

 एखाद्या विषयावर सविस्तर
माहिती पुस्तकात असते. समजा १२० पानं
त्या विषयाच्या धड्यावर असतील तर
त्यातली मोजकीच ४०-४५ पानं लक्षपूर्वक
वाचावीत. महत्त्वाच्या मुद्यांवर खूण करून
ठेवावी. एकदा दोनदा नव्हे तर डोक्यात पक्कं
होईपर्यंत वाचा. पण कृपया घोकंपट्टी करू नका.

 मुद्दे वाचून झाल्यावर शांत डोक्याने विचार
करावा. स्वत:च स्वत:शी त्या मुद्यांवर चर्चा करावी.
एखादी घटना घडली नसती किंवा दुसऱ्या पद्धत
घडली असती तर त्याचे परिणाम काय झाले
असते? यासारखे प्रश्न स्वत:लाच विचारावेत.
मात्र असं करत असताना त्या विषयाशीच
चिकटून रहावं.

विचारविनिमय सुरू असतानाच दुसरीकडे
नोट्स काढाव्यात. 
नोट्स लिहिणं म्हणजे
पुस्तकातलं जसंच्या तसं लिहिणं नाही.
त्या विषयाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहून
काढावा. संपूर्ण नोट्स लिहून झाल्यावर
पुन्हा एकदा वाचाव्यात. त्यामुळे रिविजन
करताना पुन्हा पुस्तक
वाचण्यापेक्षा त्या नोट्सवरून नजर फिरवणं
सोयीस्कर जातं.

इतर काही मुद्दे

या परीक्षांची १२ वी नंतर तयारी सुरु
केल्यास उत्तम.

पदवीनंतरही तयारी होऊ शकते

स्वत: अभ्यास करण्याबरोबरच योग्य
मार्गदर्शक निवडा. कारण मार्गदर्शनाशिवाय
ट्रॅक चुकण्याची शक्यता असते.

परीक्षा देण्याच्या एक ते दीड वर्ष
आधी अभ्यास सुरू करा.

आधी मेन्स मग प्रिलीम अशा क्रमाने अभ्यास करा.

प्रिलिमच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यास
९० दिवस पुरेसे आहेत.

विषय निवडताना विषयाची आवड, गोडी,
उपलब्ध साहित्य आणि मार्गदर्शन लक्षात
घ्यावं.

अभ्यासासाठी विविध विषयांची पुस्तकं,
नियमित वृत्तपत्रं वाचावीत आणि त्यावर
डिस्कशन करावीत.

१० वर्षांपासूनचे पेपर बघावेत. जेणेकरून
परीक्षेचा अंदाज येतो.


गाइड, मासिकं - क्रोनिकल, विझार्ड, सीएसआर,
दर्पण, स्पर्धा परीक्षा , चाणक्य मंडळ,
लोकराज्य

पुस्तकं - के सागर, दत्ता सांगलोकर, दांडेकर
आदींची पुस्तकं

साभार : Spardha Vishwa


वाचा


अभ्यास करा असा धोषा सगळेच जणं लावतात. परंतु, दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमक काय करायचं, याच्या थेट ११ टिप्स तुम्हांला देत आहेत.

१ कधीही फार तास सलग अभ्यासाला बसूनका. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.

२ अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची ...मदतच होईल.

३ अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.

४ एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झालं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा. ती गोष्ट, धडा, मॅथ्स नंतर करायचं आहे हे लक्षात ठेवा.

५ फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

६ वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडाचाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.

७ वीकेण्डला स्वतःची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.

८ अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.

९ दहावीला असलेल्या विद्याथ्र्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अ‍ॅप्टिट्युड टेस्टकरून घ्यायला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडणं सोपं जाईल.

१०. बारावीला गेलेल्या विद्याथ्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेहीलक्ष ठेवायला हवं.

११ तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करिअर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळवायला हवी. खासगी नोकरी करायची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. 


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 19 जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उपनियोजक (8 जागा), सहायक पणन व्यवस्थापक (1 जागा), उपलेखापाल (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे.

या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागा


भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागांसाठी भरती
Click On The Advt To See Full Size


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०१३



General Insurance Corporation of India- Officers Scale I (Asst Managers) Exam Call Letter
अधिक माहिती http://gic.eadmissions.net/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील 284 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिका?/
री- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये ९४ जागा


गडचिरोली जिल्हा परिषद आस्थापनेवर कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी १ जागा, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (महिला) २० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ जागा, पशुधन पर्यवेक्षक ५ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा, लघुलेखक (उ.श्रे) १ जागा, कनिष्ठ लेखा १ जागा, परिचर २३ जागा 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३ आहे.


एम.पी.एस.सी.उमेदवारांसाठी महत्वाची माहीती

राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे २०१३ रोजी; प्रवेशपत्र (Hall Tickets) उपलब्ध 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ १८ मे २०१३ रोजी घेण्यात येणार असून सदर परिक्षेचे प्रवेशपत्र आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारानी प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत.



एम.पी.एस.सी. लिपिक- टंकलेखक (इंग्रजी व मराठी) परीक्षा २०१३ च्या उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी लिपिक- टंकलेखक परीक्षा (इंग्रजी व मराठी) २ जून २०१३ रोजी घेण्यात येणार आहे परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल त्वरित अपडेट करावी. मात्र निवडण्यात आलेले केंद्र बदलू नये असे आयोगाने जाहीर केले आहे.

झंझावात एमपीएससी अभ्यासाचा

पूर्वी हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी धडपडणा-या तरुणांचं जग होतं. परंतु अलीकडे एमपीएससीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे राज्याच्या कानाकोप-यात पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या गोंधळामुळे एमपीएससी हे काय गौडबंगाल आहे, याची कल्पना आली. वृत्तवाहिन्यांनी यावर चर्चा घडवून आणल्या, मात्र एमपीएससी नेमकं काय, ती कोणी द्यावी, तिचं स्वरूप काय याची माहिती देताना कुणी दिसत नाही. या सगळ्यांचा घेतलेला आढावा...

एमपीएससी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे लघुरूप. वास्तविक संविधान अनुच्छेद ३१५ अन्वये निर्माण झालेली संस्था, याचे काही घटनादत्त अधिकार आहेत. केंद्र शासनाला प्रशासन चालवण्यासाठी जे उमेदवार हवे असतात त्यांच्या निवडीचं कार्य यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) तर राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी आवश्यक उमेदवार निवडीचं काम एमपीएससी (राज्य लोकसेवा आयोग)कडून केलं जातं. अनुच्छेद ३२०नुसार आयोगाच्या कामाची यादी दिली आहे. केवळ परीक्षा घेणं एवढंच काम आयोगाचं नाही तर अगदी निवृत्ती वेतनाचे वादही आयोगाच्या कक्षेत येतात. 

आयोगाला स्वायत्त करण्यापाठीमागे घटनाकारांची निश्चित दृष्टी होती. शासन आणि शासन करणा-यांपासून दूर राहून नि:पक्षपातीपणे काम करता यावं हा यामागे उद्देश होता. अर्थात सत्तेत आल्यावर राजकीय हस्तक्षेप आयोगाच्या अध्यक्ष निवडीबाबत होत नाही, असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. राज्यपालाचे काम मुख्यमंत्र्यांनी पुढे ठेवलेल्या यादीवर सही करणं एवढंच असतं. सुज्ञानी याचा अर्थ समजावून द्यावा.

माहितीच्या युगात लोकांपर्यंत अर्धवट स्वरूपात माहिती पोहोचते. ‘अधजल घगरी छलकत जाय’ न्यायाने एमपीएससीबाबतीतसुद्धा अर्धवट माहिती धोकादायक आणि तापदायक ठरू शकते. धोकादायक यासाठी की, करिअर निवडताना चुकीचा निर्णय घेतल्यावर तो फिरवण्यास एक वर्ष तरी जातं. उमेदवारीच्या काळातील महत्त्वाची वर्ष अपेक्षित यश मिळत नाही आणि तापदायक यासाठी त्यातून उमेदवाराची, कुटुंबाची जी चिडचिड होते त्यातून निराशा येणाची दाट शक्यता असते. म्हणून खरं तर अर्धवट ज्ञान घेऊच नये. 

एमपीएससी परीक्षा कोण देऊ शकतो इथपासून ते निवडपद्धती प्रक्रिया समजावून घेणं इथे आवश्यक आहे. खरं तर आयोगाने वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळ्या परीक्षा उत्तीर्ण होणं असा निकष लावला आहे. पण साधारणपणे आयोग ज्या पदांसाठी परीक्षा आयोजित करतं, त्यासाठी सर्वसाधारण अट पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी आहे. वयोमर्यादेच्या संदर्भात म्हणता येईल की, उमेदवारांच्या वर्गवारीप्रमाणे वयाचे निकष बदलले आहेत. सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी वयवर्षे २१(पूर्ण) ते ३३ वर्ष, इतर मागास व अनुसूचीत जाती/जमाती यांच्याकरिता ३८ वर्ष निर्धारित केलं आहे. अर्ज भरताना जी उत्सुकता, उतावीळपणा, काळजी या सगळ्यांचा विचार होतो. पण एकदा अर्ज भरण्यात यश आल्यावर बरेच उमेदवार अभ्यासाचा विचार करताना दिसत नाहीत आणि आता ऑनलाइन अर्जामुळे अर्ज भरणं हे एक मोठं दिव्य झालं आहे. अनेकांना अर्ज भरण्याची एवढी खुमखुमी असते की, अर्ज भरायचे ते कधीच सोडत नाही आणि वय संपलं तरी एखादी परीक्षाही उत्तीर्ण होत नाहीत असे विद्यार्थी आरंभशूर असतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. भरायच्या जागा दोन-तीनशे असताना लाखोंच्या संख्येने अर्ज येतात, याचा अर्थ ते सगळे बेकार असतात असं नव्हे. तर ते कुठे ना कुठे काम करत असतात. मात्र त्यांना सरकारी नोकरी हवी असते. त्यातील २० ते २५ हजारच बेरोजगार असतात ही वस्तुस्थिती आहे.

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही जीवनकौशल्य अंगी भिनवावी लागतात, जी एकूणच आयुष्यात कामी येतात. ही जीवनकौशल्यं जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केली आहेत.
=स्व-जाणीव
=समान अनुभूती
=समस्या निराकरण
=निर्णयक्षमता
=संप्रेषण
=चिकित्सक विचारसरणी
=सर्जनशीलता
=आंतरव्यक्ती संबंध
=भावभावना समायोजन
=ताणतणाव समायोजन
ही जीवनकौशल्यं अंगीकारणारी कोणतीही व्यक्ती स्पर्धा परीक्षेतच नव्हे तर जीवनातही यशस्वी होते. शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते. अशीच आयोगाची लिपिक/टंकलेखक पदासाठी परीक्षा एक जून २०१३ रोजी आहे.

लिपिक/टंकलेखक पदासाठीचा अभ्यासक्रम
मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, उता-यांवरील प्रश्न (१०० गुण)
बुद्धिमता चाचणी – उमेदवार किती अचूकपणे व जलद विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारले जातात (५० गुण)
म्हणजे एकूण – (१५० गुण)
याचाच अर्थ अनेक जण एमपीएससी म्हणजे केवळ उपजिल्हाधिकारी तहसीलदार याच पदांच्या परीक्षा असा ढोबळ अर्थ लावतात. पण खरं तर आपली पदवी पूर्व असल्यास किंवा त्याआधीही आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लिपिक होण्याचीच आपली मनीषा असेल किंवा आर्थिक परिस्थितीने क्लासची भरमसाट फी भरण्याची तयारी नसेल तर या पदाचा जरूर विचार करावा. 

एमपीएससीची तयारी कुणीही करू शकते असा मुद्दा आपण घेतला आहेच. तयारी कोणीही करत असलं तरी उत्तीर्ण मात्र कोणीही होत नाही, हे प्रामुख्याने ध्यानात घ्यावं. खरं म्हणजे अर्ज भरला की झाली तयारी, इतकी सोपी परीक्षा राहिली नाही. त्यासाठी काटेकोर नियोजन आणि प्रबोधन करण्याची गरज असते.

महाराष्ट्राला प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे आपल्या संतांनी अत्यंत साध्या व सोप्या भाषेत हे प्रबोधन केलं आहे. तुकारामांनी ‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे’ या शब्दांत अभ्यासाची निकड व्यक्त केली आहे. देशाच्या तुलनेत आपण स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर जरा विचार केला तरी महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. या अग्रेसर राज्यातल्या मुलांनी मनावर घेतलं तर विद्यार्थी यूपीएससीसुद्धा लीलया पास होऊ शकतात. त्यात अशक्य असं काही नाही.

‘सरकारी नोकरी सुरक्षित नोकरी’, अशी सर्वसाधारण समजूत असल्याने नोकरीसाठी अर्ज भरणा-यांची संख्या फार मोठी आहे. हे चुकीचं नाही, परंतु हा मोठा आकडा असाच तयार होत नाही. यात्रेसाठी जसे हवसे, नवसे गवसे गोळा होतात आणि राजकारणात सच्चे, लुच्चे, हुच्चे कार्यकत्रे असतात तसेच इथेही सा-या प्रकारचे उमेदवार असतात. त्यांचा स्तर वेगवेगळा असतो. उदा. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच अर्ज भरलेला असतो हे स्वत:वरच इतके खुश असतात की, अजून आपल्याकडे ३३व्या वर्षापर्यंत संधी आहे, अशी त्यांची ठाम समजूत असते. त्यामुळे पहिल्या वर्षी पास होणारच नाही असाच त्यांचा विचार असतो. अर्ज भरेपर्यंत व परीक्षा प्रवेशपत्र येईपर्यंत सजग असतात. बेडकाची जशी शीतकालीन समाधी लागते तशी मधल्या काळात त्यांच्या अभ्यासाची समाधी लागते. ज्यांचा दुसरा प्रयत्न असतो त्यांनीही प्रवेश पत्र आल्यावर अभ्यास सुरू केलेला असतो. जे वेगवेगळ्या अभ्यासिकांमधून अभ्यास करतात. त्यातील बहुतेक पूर्ण वेळ चर्चासत्रात मग्न असतात. त्यातही अनावश्यक अफवा यांची चर्वितचर्वण करतात. वरिष्ठ म्हणजे तीसच्या आसपासचा वयोगट. हा उमेदवार नोकरी करत अभ्यास करतो. त्याला अभ्यासाचा ताण येतो. महिला उमेदवार संसार-नोकरी सांभाळत अभ्यास करतात. त्या इतक्या चिंताग्रस्त असतात की संसार, नवरा आणि कुटुंबीय यांच्या दबावापोटी त्यांचा फारसा अभ्यास होत नाही. शिवाय ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातील मुलांची भीती तर शहरी भागातील मुलांना कृषी महाविद्यालयातील मुलांची भीती असा सगळा मामला असतो. याहीपेक्षा केवळ पालकांची इच्छा म्हणून परीक्षा देणारेही कमी नाहीत.

सांगण्याचा उद्देश जो दोन-तीन लाखांचा आकडा दिला जातो, ते सगळे अभ्यास करून प्रकट होत नाहीत. त्यापैकी जेमतेम दहा हजार मुलांचा अभ्यास चांगला असतो म्हणजे स्पर्धा ही दहा हजार मुलांमध्येच असते, लाखालाखांत नाही. म्हणून दोन-चार लाख मुले परीक्षेला बसल्यावर स्पर्धा खूप वाढली असं होत नाही तर आयोगाला त्याच्या बैठक व्यवस्थेचा अतिरिक्त ताण येतो, असंच म्हणावं लागेल. अर्थात आयोग हा ताण परीक्षा फी वसुल करून सोडवतो, हेही आलंच.

अलीकडे विविध क्षेत्रांतील साचलेपणामुळे त्या त्या क्षेत्रात नोक-या उपलब्ध नाहीत. उदा. कम्प्युटर, बी.एस्सी. (कम्प्युटर) किंवा बी.ई. (कम्प्युटर), बी.एस्सी. (आयटी) या मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश घेताना जे पॅकेजचे गाजर दाखवले होते, ते आता संपले आहे आणि त्यामुळे चांगल्या नोक-या नसल्याने हे आयटीवाले पर्याय नसल्यासारखे एमपीएससी परीक्षा देत आहेत. हा जो लोंढा आहे जो शालेय पातळीवर असताना ब-यापैकी हुशार होता, तो आता कृषी पदवीधारकांचा मुख्य स्पर्धक आहे. त्याशिवाय दरवर्षी विद्यापीठ नामक कारखान्यातून बाहेर पडणारा सामान्य पदवीधर सरकारी नोकरीवर डोळा ठेवून असतो. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे २००५ साली आलेल्या माहितीचा अधिकार कायद्याने एमपीएससी निवड प्रक्रिया, पोलीसभरती निवड प्रक्रिया यांमध्ये पारदर्शकता आली आहे. १९९९ साली एमपीएससीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचारात सामील असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे पैसे भरून पदं ‘फिक्स’ करता येतात. असा सामान्यांचा समज होता, मग अभ्यासापेक्षा ‘लिंक’वर ब-याच लोकांचा अधिभार असायचा. आता अशी कुठे लिंक सापडत नाही. हे नक्की झाल्यावर अभ्यासाला पर्यायच राहिला नाही. मोठया संख्येने उमेदवार अर्ज करू लागले त्याचे हेदेखील कारण आहे.

एकूण काय तर आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याची इत्थंभूत माहिती घ्यावी. आयोग फक्त एवढय़ाच गोष्टी पुरवत असतं. त्या माहितीचा वापर नेमकेपणाने करता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी मुलं अथवा उमेदवार यशस्वी होतात, त्यापैकी बहुतेक अगदी सर्वसामान्य अशा पार्श्वभूमीतून आलेले असतात. अगदी यूपीएससी अथवा एमपीएससी दोन्हीकडे आपल्याला हेच पाहायला मिळतं. घरची परिस्थिती साधारण असणारी कितीतरी मुलं यशस्वी होताहेत. त्यामुळे योग्य दिशा, मार्गदर्शन, तीव्र इच्छाशक्ती आणि स्वयंशिस्त याच्याच आधारे आपण यशस्वी होऊ शकतो. अभ्यासाचा असा झंझावात निर्माण करू या की, आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी पद आपलंच असेल.